Posts

Showing posts from March, 2019

*सांगा.....राजसाहेब...सांगा!*

*सांगा.....राजसाहेब...सांगा!* *साधारणतः कुठल्याही राजकिय पक्षाचा वर्धापन दिन हा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी वाटचालीविषयी दिशादर्शक व उद्बोधक असा असतो...आणि तो तसाच असावा यात दुमत असण्याचे कारण नाही.*              *पण काल झालेल्या एका पक्षाचा वर्धापन दिन देशाच्या पंतप्रधानांच्या,मोदीजींच्या द्वेषाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात पार पडला.(कदाचित आघाडीमध्ये सामील होण्यासाठीची शेवटची धडपड असावी)* *मोदीद्वेष असायला हरकत नाही...किंबहुना आजच्या राजकिय परिस्थितीमध्ये महाठगबंधन मध्ये सहभागी होण्याची ती पूर्वअट असावी इतका पराकोटीचा मोदीद्वेष पहायला मिळतो आहे.तो असायला हरकत नाही पण हा द्वेष करता करता आपण देशाच्या सुरक्षा यंत्रणांचे मनोबल खच्ची करतोय याच्याशी यांना काहीही देणेघेणे उरलेले नाही.एका राष्ट्रभक्त अधिकार्याला तेही कोणा ऐर्यागैर्या नाही तर देशाचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेल्या अजितजी डोभाल यांनाच आपल्या गलिच्छ राजकिय डावपेचामधील सोंगटी करण्याचा निंदणीय डाव खेळला जातोय...असो...* *म्हणे...पुलवामा हल्ला भारतानेच पाकिस्तानच्या सहमतीने घडवून आणला आहे व निवडणुका जिंकण्यासाठी प