Posts

Showing posts from November, 2022

फुर्रोगामींचा दुटप्पीपणा

Image
१८ फेब्रुवारी २०१५ गेल्या दोन दशकांपासून राष्ट्रीय स्तरावर "धर्मनिरपेक्ष" या शब्दाभोवती राजकारण गुंफले जात आहे.तथाकथित बुद्धीवादी यावर चर्वितचर्वण करताना आपल्याला सर्वत्र आढळतात.वास्तविक पाहता धर्मनिरपेक्ष (तथाकथितच) म्हणजे काय तर एका अर्थाने सर्वधर्मसमभाव - परंतु तशी वस्तुस्थिती कुठेच आढळत नाही. "धर्मनिरपेक्ष" म्हणजे हिंदु धर्मावर यथेच्छ टिका करुन झोडपून काढणे.आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे,असा एककलमी कार्यक्रम हा तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक (मा.अडवानींच्या मते ढोंगी धर्मनिरपेक्ष) चालवत आहेत. किंबहुना त्यावरच त्यांची रोजी रोटी चालू असते.    हा सर्व उहापोह येथे करण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा धर्म "पुरोगामी" हा चावून चोथा झालेला शब्द नेहमी वापरला जातो.या शब्दाची महती सांगायची म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणेच केवळ हिंदुत्वनिष्ठांना आणी हिंदुधर्माला झोडपणे यासाठीच या शब्दाचा उपयोग केला जातो.आणी जो तो मग जास्त टिका टिप्पणी करुन किंवा कल्पनाशक्तीच्या जोरावर आपले पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी धडपडताना दिसतो. अंनिसं चे नरेंद्र दाभोलकर यांच्या दुर्दैवी मृत्युनं

अनावश्यक वाद

Image
 १५ फेब्रुवारी २०१५ मागील काही दिवसांपूर्वी शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी साईबाबांना देवत्व देण्याविरुद्ध आवाज उठवला व एक वाद चालू झाला.मूळात हिंदु धर्मात पूजनीय समजल्या जाणार्या शंकराचार्यांपैकी स्वरुपानंद यांनी आजपर्यंत हिंदू धर्मासाठी काय योगदान दिले.?किंबहुना त्यांच्या वक्तव्यांनी आणी कृतीने नेहमीच शंकराचार्य या पदाची आणी पर्यायाने हिंदू धर्माची विनाकारण बदनामीच झाली आहे. साईबाबांबाबतचा वादही अनावश्यक असाच आहे. वास्तविक हिंदु धर्म हा जगातील सर्वात सहिष्णु धर्म आहे. "सर्वे भवन्तु सुखिनः (सर्वजण सुखी होवोत.फक्त हिंदु नाही.) एकम् सत् विप्रः बहुधाः वदन्ति.(सत्य (परमेश्वर)एक आहे.परंतु त्याच्याकडे जाण्याचे मार्ग अनेक असू शकतात.) असे हिंदू धर्म मानतो.कुणी मूर्ती पूजा करतो कुणी निर्गुण निराकाराची आराधना करतो.कुणी मनुष्यातच ईश्वर शोधतो तर कुणी दगडाला शेंदूर फासून त्याला भजतो.अशा प्रकारे भक्ती स्वातंत्र्य इतर धर्मात?(पंथात) कुठे आहे. एकेश्वरवाद्यांना इतरांची पूजा सहनच होत नाही.त्या पृष्ठभूमीवर हिंदुधर्मातील विचारस्वातंत्र्य अधिकच ठळकपणे उठून दिसते.त्यामुळे कुणाच्याही भावना दुखावणार

पू.सरसंघचालकांच्या वक्तव्याचा अन्वयार्थ!

Image
 १५ फेब्रुवारी २०१५ पू.सरसंघचालकांच्या वक्तव्याचा अन्वयार्थ! भरतपूर येथील "अपना घर" या सेवाभावी संस्थेच्या कार्यक्रमात पू.सरसंघचालक म्हणाले  "मदर तेरेसा यांचे सेवाकार्य अतिशय उत्तम होते.मात्र सेवा केली जात असलेल्या लोकांना ख्रिश्चन धर्म स्विकारण्यास सांगितले जात असे.धर्मांतराबद्दल  आमची काही हरकत नाही.परंतु सेवेच्या नावाखाली धर्मांतर होत असेल तर सेवाकार्य व्यर्थ ठरते." म्हणजेच निस्वार्थ बुद्धीने,कुठलाही अंतस्थ हेतू न ठेवता केलेले सेवाकार्य महान असते असे त्यांना म्हणायचे होते परंतु पुन्हा एकदा धर्मनिरपेक्षतेच्या ठेकेदारांनी वस्तुस्थिती समजून न घेता त्यांच्या वक्तव्याचे प्रसारण केले व ख्रिश्चन मिशनर्यांच्या मेहरबानीवर जगणार्या वृत्तपत्रांनी व वृत्तवाहिन्यांनी तर ख्रिश्चन धर्मगुरु ,ख्रिश्चन धर्मांतरीत व्यक्ती आणी धर्मनिरपेक्षीतेचे ठेकेदार यांच्याच प्रतिक्रिया वारंवार दाखवून पू.सरसंघचालकांच्या वक्तव्यावर देशभरातून टिकेचा भडीमार होत असल्याचे तद्दन खोटे चित्र उभे केले आहे. हिंदु संतांविषयी आरोप सिद्ध होण्याआधीच आरोपी घोषीत करुन त्यांची आणी हिंदु धर्माची प्रचंड बदनामी करणा

राजस्थान च्या निमित्ताने ....

Image
  १५ जुलै २०२० राजस्थान च्या निमित्ताने .... राजस्थानमध्ये राजकिय अस्थिरता का निर्माण झाली हे पहायला हवे. देशभर मोदी त्सुनामी जोरात असताना सेमीफायनल म्हणून गाजलेल्या राजस्थान-मध्यप्रदेश-छत्तीसगड-दिल्ली या राज्याच्या निवडणुकांमध्ये दिल्ली वगळता सचिन पायलट,ज्योतिरादित्य सिंधिया,भूपेशसिंह बघेल असे नवीन नेतृत्व प्रदेशाध्यक्ष ,प्रचार प्रमुख म्हणून पुढे आणले होते.याचा थेट परिणाम होऊन तिन्ही राज्यांमध्ये सत्ताविरोधी वातावरण निर्माण करण्यात काँग्रेस बर्यापैकी यशस्वी ठरली होती.आणि त्याचा फायदा सुद्धा निवडणुकीनंतर काँग्रेसला मिळालेला पहायला मिळतो.पण म्हणतात ना...युद्धात जिंकले आणि तहात हरले तसे काँग्रेसचे झाले...ज्या नवीन नेतृत्वाला पुढे आणून काँग्रेसने पर्यायी स्थानिक नेतृत्व उभे करुन भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले...त्या नवीन नवीन नेतृत्वालाच राजस्थानमध्ये सचिन पायलट व मध्यप्रदेश मध्ये ज्योतिरादित्य यांना (यांना अधिकच) दुय्यम स्थान देऊन स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला... वास्तविक पाहता या नवीन नेतृत्वाला अधिक ताकद देऊन काँग्रेस भाजपला पुरते नामोहरम करु शकली असती पण ती संधी दरबारी राजकारणामु