Posts

Showing posts from November, 2021

३७० ची पायाभरणी

Image
"३७० ची पायाभरणी" ३ मार्च २०१५ त.दा. सुमारे २ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुस्लीमबहुल कश्मीरमध्ये पीडीपीला आणी हिंदुबहुल जम्मूमध्ये भाजपला लोकमान्यता मिळाली.परंतु स्पष्ट बहुमत कोणालाही मिळाले नाही. म्हणून गेले २ महिने तेथे राजकिय अस्थिरता निर्माण झाली होती. मागील सत्ताधीश असलेल्या नैशनल कॉन्फरन्स आणी काँग्रेसला जनतेने पूर्णपणे नाकारले होते. तरीही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नै.कॉ.आणी काँग्रेस पीडीपीला चुचकारत होते.व एकप्रकारे जनादेशाचा अपमानच केला जात होता.म्हणजे पराभव होऊनही मागील दाराने सत्तेमध्ये सहभागी होण्याचे दोघांचे आटोकाट प्रयत्न चालले होते. अशातच किमान समान कार्यक्रमावर आधारीत सरकार स्थापण्याचे भाजप व पीडीपीने घोषीत केले आणी सत्तांध नैशनल कॉन्फरन्स आणी काँग्रेसचे मनसुबे उधळले गेले. एक प्रखर  राष्ट्रवादी विचारांचा पक्ष असलेल्या भाजप आणी पीडीपी एकत्र सरकार स्थापन करतात याला एक सकारात्मक घटना म्हणून बघितले पाहिजे.एका  फुटिरवादी पक्षाच्या विचारांमध्ये योग्य परीवर्तन घडून येण्याची आपण वाट पाहिली पाहिजे.खर्या अर्थाने या सरकारमुळे जम्मू काश्

पुणे पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने

Image
*पुणे पदवीधर च्या निमित्ताने....* ६ डिसेंबर २०२० त.दा. *गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकिय अवकाश व्यापलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या.कधी नव्हे एवढी चुरस यावेळी पहायला मिळाली.नाहीतर पदवीधर निवडणुका कधी होऊन जातात हे नागरिकांना कळत सुद्धा नव्हते.बरेच नागरिक या निवडणुकीबद्दल,प्रक्रियेबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असलेले दिसले.* *अतिशय चुरशीच्या वाटणाऱ्या व भाजपाच्या बाजूने वाटणारा निकाल अनपेक्षितपणे विरोधात आला.आणि अनेकांना धक्का बसला.विशेषतः आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना ज्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत मतदार बाहेर काढून मतदान करुन घेण्यासाठी प्रयत्न केले...प्रत्येक निवडणुक काही ना काही शिकवून जात असते...याही निवडणुकीमुळे विचारमंथन...आत्ममंथन...पराभवाचे विश्लेषण...नेतृत्वावर प्रश्नचिन्ह...अशी एक ना अनेक उलथापालथ होताना दिसते आहे...हे व्हायलाच हवे.* *फेसबुक..व्हाॕट्सॲप युनिव्हर्सिटी मध्ये अनेक विचारवंत जन्माला घातलेत..या युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी म्हणून  या निवडणुकीच्या बाबतीत माझे स्वतःचे निरिक्षण नोंदवावेसे वाटले...* *सुरुवातीपासूनच या

पंजाबची दुखरी नस

Image
"पंजाबची दुखरी नस"  -रविंद्र बाळासाहेब माने        (तळेगाव दाभाडे) *आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी बहुचर्चित तीन कृषी कायदे रद्द केले..आणि संपूर्ण देश अवाक झाला...हीच तर मोदींची खासीयत आहे...जहाँ विरोधीयोंकी सोच खतम होती है...मोदीजी वहाँसे आगे सोचना शुरु करते है..हा फिल्मी डायलॉग आठवावा इतका रोमांचकपणे मोदीजी आपले निर्णय घेऊन प्रतिस्पर्ध्यास नामोहरम करतात...* *आज हा निर्णय झाला आणि स्वाभाविकपणे हा निर्णय युपी पंजाबसह ५ राज्यांच्या निवडणुकांशी जोडून पाहिला जात आहे...आणि इथेच साधारण राजकारणी आणि महान नेता यातील फरक स्पष्ट होताना दिसतो...वास्तविक पाहता किसान आंदोलन हे गेल्या काही दिवसांपासुन निष्प्रभ होत आले आहे...ते धगधगते ठेवण्यासाठीच काही अराजक घटना घडविल्या गेल्या...पण विरोधकांच्या हाती फार काही लागले नाही...मग असे असताना आजच हा निर्णय का झाला?* *मित्रांनो..पंजाब हे एक सीमावर्ती राज्य आहे..आपले शत्रुराष्ट्र पाकिस्तान गेल्या अनेक दशकांपासून खा..स्तानी चळवळीला बळ देऊन पंजाबला कायम अशांत ठेवून राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणत आहे